नवी दिल्ली – मध्य प्रदेशातील भाजपची विवादित लोकसभा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर हिच्या आणखी एका वक्तव्याने भारतीय जनता पक्ष अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरने आज एका माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना, “नथुराम गोडसे ‘देशभक्त’ होते, ते ‘देशभक्त’ आहेत आणि ते ‘देशभक्तच’ राहतील. जे लोक नथुराम गोडसेंना आतंकवादी म्हणतात त्यांनी आत्मचिंतन करायला हवं, अशा लोकांना या निवडणुकीत जनतेकडून योग्य उत्तर देण्यात येईल”असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
दरम्यान, साध्वीच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेसने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. साध्वीच्या वक्तव्याबाबत काँग्रेसची भूमिका मांडताना काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी, “भारत मातेच्या आत्म्यावर गोडसेच्या उत्तराधिकाऱ्यांकडून हल्ला केला जात असून केंद्रातील भाजप सरकार म्हणजे गोडसेचे उत्तराधिकारी आहे. भाजपच्या नेत्यांकडून राष्ट्रपित्याच्या हत्याऱ्याला देशभक्त म्हंटले जात आहे तर देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या करकरेंसारख्या थोर देशभक्ताला देशद्रोही ठरवले जात आहे.”
दरम्यान, भाजपतने आपली लोकसभा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर हिच्या वक्तव्यापासून स्वतःला दूर केले असून प्रज्ञा सिंह ठाकूर हिच्या वक्तव्याबाबत बोलताना भाजप नेते नरसिंह राव यांनी, “नथुराम गोडसे” देशभक्त आहेत आणि राहतील या प्रज्ञा सिंगच्या या विधानाशी भाजप सहमत नाहीये. आम्ही तिच्या विधानाचा निषेध करतो. तसेच पक्षातर्फे तिला या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण विचारण्यात येईल, तिने या विधानासाठी सार्वजनिकपणे माफी मागितली पाहिजे.” अशी भूमिका मांडली.
R Surjewala,Congress: India's soul is under attack by successors of Godse, the BJP ruling dispensation.BJP leaders are describing the murderer of father of the nation as a true nationalist&declaring those who sacrificed their lives for nation like Hemant Karkare as anti-nationals pic.twitter.com/yX8SuEndlL
— ANI (@ANI) May 16, 2019