नागपूर: सोमवारी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूर मध्ये सुरवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्र घेत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरवात होण्यापूर्वी महाविकासआघाडीच्या विधिमंडळ पक्ष आमदारांची महत्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपच्या भूमिकेवर टीका केली आहे.
या बैठकीत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते व आमदारांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात आनंदाचं वातावरण आहे त्यामुळे जनतेचं काम करा, त्यांचा भ्रमनिरास होईल असं काम करु नका. तसेच भाजपाला तंगड्यात तंगड घालण्याची सवय आहे. त्यामुळे मला अनुभव नसल्याने ते अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हणत भाजपाला टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे यांनी आज महाराष्ट्र विकास आघाडी विधिमंडळ पक्ष बैठकीत सर्व आमदारांना मार्गदर्शन केले.
Chief Minister Uddhav Balasaheb Thackeray addressed the gathering of all MLAs of the Maharashtra Vikas Aghadi. pic.twitter.com/aecC1HqNYC
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 17, 2019
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, स्वातंत्र्य वीर सावरकरांबाबत आमची जी भावना काल होती, तिचं आजही आहे आणि उद्याही तशीच राहील, त्यात काही फरक पडणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान राहुल गांधींनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटतांना पाहायला मिळत आहेत.