नागपूर : राज्यात थंडीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सभागृहात चांगकेच धारेवर धरले. हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सुद्धा विरोधकांनी शेतकरी प्रश्न व इतर मुद्यांवरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली.
यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर तोफ डागली. महाराष्ट्र आपल्या आक्रमकतेला साथ देईल असे भाजपला वाटत असेल तर ते मूर्ख आहेत. असा प्रतिकार आमदार आव्हाड यांनी केला .
थोड्यावेळापूर्वी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आमदारासोबत सभात्याग केला आहे. मुख्यमंत्र्याकडे काही ठोस आश्वासने नाहीत त्यामुळे आम्ही सभात्याग करीत आहोत असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तुम्ही मुख्यमंत्र्यांवर कितीही दबाव आणा आम्हाला काही फरक पडत नाही. असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. विरोधकांनी विरोध करावं तो त्याचा अधिकार आहे पण लोकशाहीत काही नियम असतात ते देखील विरोधकांनाही पाळायला हवे. असा विरोधकांना चिंता काढला.