औरंगाबाद : महानगरपालिकेत भाजपच्या 26 नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्याकडे सर्व नगरसेवकांनी आपल्या पदाचे राजीनामे सोपवले.
महानगरपालिकेत राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सेनेने ठेवला होता. त्याला भाजपने जोरदार आक्षेप घेतला होता. उपमहापौर विजय औताडे यांनी काल उपमहापौर पदाचा नाट्यमय राजीनामा दिल्यानंतर आज २६ नजर सेवकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले.