लखनौ – भाजपने आपल्या अहंकारी विचारांमुळे बेरोजगारीचा मुद्दा मान्य केला नाही, अशा शब्दात बसपा नेत्या मायावती यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
देशातील बेरोजगारीचा मुद्दा संसदेमध्ये मान्य करण्यास भाजपने नकार दिला आहे. ही त्यांची चुकीची आणि अहंकारी विचारधारा नाही तर काय आहे? बेरोजगारीबद्दल कोणा युवकाला अपमान आणि अवहेलना ऐकणे आवडेल? भाजपशी संबंधित लोकांनी आपल्या संकुचित मानसिकतेतून बाहेर यायला हवे. त्यानंतरच देशासाठी काही चांगले होण्याची शक्यता आहे, असे मायावतींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
1. कर्ज में डूबी घुटन का जीवन जीने को मजबूर किसानों द्वारा आत्महत्या की खबरें विचलित करती हैं, किन्तु अब बेरोजगार युवाओं द्वारा भी आत्महत्या करने की विवशता ने राष्ट्रीय चिन्ता, बेचैनी व आक्रोश को और बढ़ा दिया है। फिर भी विकास व इण्डिया शाइनिंग आदि जैसा भाजपा का दावा कितना उचित?
— Mayawati (@Mayawati) February 13, 2022
कर्जाच्या ओझ्यामुळे देशातील शेतकऱ्यांनी आत्महत्या करणे अतिशय त्रासदायक आहे. मात्र आता देशातील बेरोजगार तरुणांवरही आत्महत्या करण्याची वेळ येते आहे. यामुळे देशाची चिंता, काळजी आणि संताप वाढीस लागत आहे. देशाच्या विकासाबाबत आणि इंडिया शायनिंगबाबत भाजपने केलेले दावे किती योग्य आहेत, असा प्रश्नही मायावतींनी उपस्थित केला आहे?