मुंबई – अर्णब गोस्वामी किंवा कंगना राणावत यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. मुख्यमंत्र्यांचा उल्लेख योग्य पध्दतीनेच केला पाहिजे, असे स्पष्ट करत सोशल मिडियावर एखादी ओळ सरकारच्या विरूध्दात लिहिली तरी त्याला अटक केली जाते, अशी सध्याची राजकीय स्थिती आहे अशी बोचरी टीका विधान सभेतीलविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
कायद्याच्या राज्यात प्रत्येक गोष्टीला कायद्याने उत्तर द्यायचे असतं. एखाद्याने चूक केली तर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. पण आमच्याविरोधात बोलले तर पोलिसांचा वापर करु ही भूमिका योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
आमच्यावेळी विरोधात लिहिले म्हणून कोणाला जेलमध्ये टाकलं नाही. सोशल मीडियावरील अनेक लोकांना नोटीस पाठवून एक सत्र सुरु आहे. मुस्कटबाजी सुरु आहे. माझं, सुधीर मुनगंटीवार आमचं कार्टून आलं त्यावर गलिच्छ लिहिलं त्यावर कारवाई नाही, अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.
अर्णब गोस्वामीने माझ्याविरोधातही ट्रायल चालवले होतं. तीनवेळा चालवले होते. एकदा तर मी अमेरिकेत असताना गुंतवणूकदारांची भेट घेत असताना ते कॅमेरे वेगळेच काम करत होते. याचा अर्थ भारतात आल्यावर मी त्यांना जेलमध्ये टाकले नाही. तर भारतात येऊन उत्तर दिले. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या देशात कायदा आहे, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.