नवी दिल्ली – काँग्रेसच्या माजी अध्यक्ष आणि युपीएच्या प्रमुख सोनिया गांधी रायबरेली लोकसभा मतदार संघात प्रथमच जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेदरम्यान सोनिया गांधी यांनी भाजप पक्षावर जोरदार तोफ डागली.
त्या म्हणाल्या की ‘सत्तेत राहण्यासाठी आणि नरेंद्र मोदींना सत्तेवर ठेवण्यासाठी भाजपकडून लोकसभा निवडणुकीत सर्वच मर्यादा ओलांडण्यात आल्या आहे. देशात सत्ता कायम ठेवण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडणे दुर्दैवीच असल्याचे सांगत त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.’मागील काही वर्षांत देशातील निवडणूक प्रक्रियेवर अनेकदा संशय निर्माण झाल्याचे सोनिया यांनी नमूद केले.सोनिया गांधी यांच्यासोबत या दौऱ्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी उपस्थित होत्या.
तत्पूर्वी, केरळातील वायनाड मतदार संघाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचार खोटारडेपणा, विखारी आणि द्वेषमुलकपणाचा होता अशा खोचक शब्दात टीका केली होती.