नवी दिल्ली – टीव्हीवरच्या कार्यक्रमात राजकीय विषयांवर चर्चा होत असताना त्या चर्चांचा स्तर दिवसेंदिवस ढासळत चालल्याचेच दिसून येते आहे. अशाच एका कार्यक्रमात महाराष्ट्राच्या विषयावर चर्चा होत असताना कॉंग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. तेव्हा लोक तुम्हाला जोड्याने मारतील अशी टिप्पणी भाजपचे प्रवक्ते गौरव भाटीया यांनी केली.
राजकीय नेत्यांचा प्रचार आणि सभांमुळे करोना वाढत असल्याचे समोर येत आहे. त्यावरून वाद सुरू झाला. कॉंग्रेसचे प्रवक्ते अजॉय कुमार म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतही बोलायला हवे. मात्र आम्ही काहीच बोलत नाही.
तेव्हा भाजपचे भाटीया म्हणाले की राहुल गांधी यांनीच प. बंगालमध्ये सभा घेतली. त्यांनीच माफी मागायला हवी. यावेळी महाराष्ट्रातील घडामोडींवर टिप्पणी करत त्यांनी वरिल विधान केले. तुमच्या सरकारने वसुली केल्यामुळे आज त्या राज्यात ही स्थिती असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर हा फालतू माणूस आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे असे प्रत्युत्तर कॉंग्रेस प्रवक्त्याने दिले.
हे केवळ उदाहरण झाले. मात्र बहुतेक वाहिन्यांवरच्या चर्चेचा दर्जा असाच होत चालला असल्याचे व त्यात मुद्द्यांचाच अभाव असल्याचे सातत्याने निदर्शनास येते आहे.