नगर – निवडणुकीमध्ये आम्हाला विखेंची साथ मिळालीच होती याबद्दल दुमत नाही. आमच्याकडे संख्याबळ नसल्यामुळे व ऐनवेळेला कॉंग्रेसने गटनेता बदलल्यामुळे आमचे संख्याबळ होऊ शकले नाही, अशी स्पष्ट कबुली भाजपाचे जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
अध्यक्ष -उपाध्यक्ष निवडीनंतर वाकचौरे बोलत होते विखेंचे पाठबळ आम्हाला मिळालेले होते पण दुसरीकडे भाजपचे संख्याबळ कमी होते.
जर विखे गटाचा गटनेता राहिला असता तर आम्हाला निश्चित याचा उपयोग झाला असता व आम्ही आकड्यांची जुळवाजुळव केली असती पण तसे होऊ शकले नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीतल्या नेत्यांचा सुद्धा आमच्या नेत्यांशी संपर्क झाला व निवडणूक तुम्ही बिनविरोध करा अशी त्यांनी विनंती सुद्धा केली होती असे वाकचौरे यांनी स्पष्ट केले.
आमच्या वरिष्ठांनी या संदर्भातला निर्णय घेऊन अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवायची नाही असे सांगितल्याने आमच्यामध्ये एकमत झाले व त्यानुसारच आम्ही या निवडणुकीतून माघार घेतली. कॉंग्रेस पक्षाने विखे गटाचा गटनेता ऐनवेळी बदलल्यामुळे आम्हालाही खेळी करता आली नाही अशी कबुली सुद्धा त्यांनी दिली.