मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण या मुख्य मागणीसह अन्य् मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत संप चालूच राहील यावर एसटी कर्मचारी ठाम आहे. त्यामुळे या संपावर तोडगा निघणे दिवसांदिवस कठीण होत चालले आहे. त्यात एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबल करण्यात आले आहे. त्यामुळे वातावरण आणखीच चिघडले आहे.
माननीय ना.अजितदादा पवार
उपमुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्यपत्रास कारण की…एसटी कर्मचाऱ्यांचे आत्महत्या सत्र थांबवण्यास पुढाकार घ्यावा.. त्यांच्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून @msrtcofficial चे शासनात विलिनीकरण या मुख्य मागणीवर त्वरीत तोडगा काढावा…
चित्रा किशोर वाघ* pic.twitter.com/OWRZVZuR1C
— Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) (@ChitraKWagh) November 16, 2021
दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांना एक पत्र लिहले आहे. या पत्रात वाघ यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे आत्महत्या सत्र थांबवण्यास पुढाकार घ्यावा.. त्यांच्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण या मुख्य मागणीवर त्वरीत तोडगा काढावा. अशी विनंती केली आहे.
दादा, आपण आत्तापर्यंत ज्या विषयात लक्ष घातलं तो यशस्वीपणे तडीस नेला आहे. त्यामुळे आत्ताही आपण या प्रकऱणात लक्ष घातलं तर तो सकारात्मकपणे निकाली निघेल याची मला खात्री वाटते. असा विश्वास अजीत पवारांबद्दल चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे.
चित्रा वाघ यांनी उपमुख्यमंत्री अजीत पवारांना लिहिलेले पत्र
आपल्याला माहित आहे की, गेले 5 दिवस एसटी कर्मचाऱ्यांचे आपल्या मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. पण या आंदोलनाची सरकार दरबारी योग्य ती दखल घेतली जात नाहीये. त्यामुळे आंदोलन तीव्र होत चालले आहे. इच्छा असेल तर मार्ग निघतोच पण शिवसेनेचे मंत्री अनिल परब आडमुठेपणा करत व्हिलनच्या भूमिकेत जात आहेत.
एसटी विलिनीकऱणाचा मुद्दा काढला की बॅलन्सशीट पुढे केली जातेय. सुमारे 35 पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलीय. त्यांची मुलं पोरकी झालीत. पत्नी विधवा झाल्या आहेत. ही जीवितहानी कशी भरुन येणार…? माणसाच्या जीवाची किंमत बॅलन्सशीटवर ठरवली जाणार का…? आयुष्याच्या बॅलन्सशीटमध्ये जगणं महाग आणि मरण स्वस्त झालंय.
दादा, आपण आत्तापर्यंत ज्या विषयात लक्ष घातलं तो यशस्वीपणे तडीस नेला आहे. त्यामुळे आत्त्ही आपण या प्रकऱणात लक्ष घातलं तर तो सकारात्मकपणे निकाली निघेल याची मला खात्री वाटते. अजून कोणत्या कर्मचाऱ्याने आत्महत्याचे पाऊल उचलण्यापूर्वीच त्यांची मुख्य मागणी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे याची आपण त्वरीत दखल घ्यावी ही अपेक्षा.