मुंबई – विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेतही भाजप चमत्कार घडवणार की, महाविकास आघाडी राज्यसभेतील पराभवाचा बदला घेणार याची उत्सुकता आहे. त्यातच आता भाजपने बदलेली स्टॅटेजी पाहता, महाविकास आघाडी या निवडणुकीत वरचढ ठरण्याची शक्यता आहे. अवघ्या काही तासांतच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
विधान परिषदेच्या भाजपच्या उमेदवार उमा खापरे यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्टॅटेजीत बदल केला आहे. त्यामुळे चौथ्या आणि पाचव्या पसंतीच्या क्रमांकात अदलाबदल झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानुसार उमा खापरे यांच्या ऐवजी भाजपकडून प्रसाद लाड यांना पसंती मिळणार आहे. लाड यांना विधान परिषदेचा अनुभव पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
पक्षीय संख्याबळ जुळत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं दिसतय. छोटे पक्ष आणि अपक्ष मिळून 29 आमदार आहेत. या सर्वांनी भाजपला मतदान केले तर निवडणूक भाजपसाठी सोपी होईल हे स्पष्ट होतं. मात्र यापैकी काही मतदार मविआच्या संपर्कात आहे. भाजपच्या आशा मावळल्या आहेत.
एकंदरीत भाजपने पाच उमेदवार दिले असून यापैकी पाचवे उमेदावर प्रसाद लाड यांना मत देण्याच्या सुचना भाजपकडून करण्यात आल्या आहेत. अर्थात यामुळे उमा खापरे यांचा पराभव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.