मुंबई – राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यामुळे शिवसेना एनडीएमधून बाहेर पडली होती. त्यानंतर पहिल्यांदाच भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करण्यात आला आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी वेग आला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरच चर्चा केली. राष्ट्रपती निवडणूक संदर्भात दोघांमध्ये फोनवरून चर्चा झाली. तसेच एनडीएच्या उमेदवाराला सहकार्य करण्या संदर्भात चर्चा झाल्याची वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे.