बलिया – भारतीय जनता पक्षाने उत्तरप्रदेशात मागासांचा विश्वासघात केला असा आरोप आम आदमी पक्षाचे नेते खासदार संजयसिंह यांनी केला आहे. मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या सरकारच्या काळात उत्तरप्रदेशात दलित अत्याचाराच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत असा आरोपही त्यांनी केला.
आप पक्षाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मागास मेळाव्यात बोलताना ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला सत्तेवरून घालवून घटनेनुसार देश चालवण्याची आज खरी गरज आहे असे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री अदित्यनाथ यांच्या कारभारावर टीका करताना ते म्हणाले की त्यांचे सरकार रोज लोकांना त्यांची संपत्ती जप्त करण्याची व त्यांच्यावर खटले दाखल करण्याची धमकी देत आहे.
मुख्यमंत्र्यांनी गेल्याच आठवड्यात ट्विटरवरून ही धमकी दिली आहे असे ते म्हणाले. भाजप सरकारच्या काळात महागाईने गरीबांचे जगणेही मुष्किल झाले आहे असा दावाहीं संजयसिंह यांनी यावेळी केला.