मुंबई – पालघर साधू हत्याकांडाप्रमाणेच जत तालुक्यात देखील साधून बेदम मारहाण करण्यात आली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. हिंदुत्वासाठी सरकार सोडले परंतु राज्यात साधू सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालेव अशी टिपण्णी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केली होती. यानंतर आता भाजपकडून पाटील यांच्या विधानाचा समाचार घेण्यात आला आहे.
भाजप नेते अतुल भातखळकर यांनी याबाबत एक ट्विट करत “पालघर साधू हत्याकांडाच्या वेळी बहुदा जयंत पाटील अंतराळात फिरायला गेले होते” असा टोला लगावला आहे. आपल्या ट्विटमध्ये भातखळकर म्हणतात,”हिंदुत्ववादी म्हणून सत्तेत आलेल्या शिंदे आणि भाजपच्या राज्य सरकारच्या काळात साधू सुरक्षित नाहीत. साधूंना मारहाण करणे अयोग्य असून मारहाण करणे चुकीचे आहे इति जयंत पाटील. पालघर साधू हत्याकांडाच्या वेळी बहुदा जयंत पाटील अंतराळात फिरायला गेले होते. त्यांना ती घटना माहितीच नसावी”
जयंत पाटील यांनी सांगलीत बोलताना साधूंना बेदम मारहाण झाल्या प्रकरणी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. साधूंना मारहाण करणे हा प्रकार योग्य नसून अशा प्रकराची मारहाण करणे चुकीचे असलयाचे देखील जयंत पाटील यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर पाटील यांच्या विधानावर भाजपकडून प्रतिक्रिया देण्यात आली.