नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षा संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र यावरील अंतिम निर्णय उद्या सकाळी होणार आहे. त्यातच आता विरोधी पक्षाकडून सरकारवर टीका करण्यात येत आहे. कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. राज्यातील सत्तासंघर्षावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल करत भाजपला कर्नाटकमध्ये घडलेल्या तमाशाची महाराष्ट्रात पुनरावृत्तीचा भाजपचा प्रयत्न असल्याचे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.
टीवी दिखा रहा है कि भाजपा महाराष्ट्र में संस्थाओं, संविधान को ठेंगा दिखाते हुए कर्नाटक का खेल फिर से दोहराना चाह रही है।
महाराष्ट्र में 12000 किसानों ने आत्महत्या कर ली। उनके लिए भाजपा सरकार की जेब से तो मदद नहीं निकली।
क्या हम जनादेश के खुले अपहरण के दौर में पहुँच चुके हैं?
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) November 25, 2019
प्रियंका गांधी यांनी आज आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपावर निशाणा साधला आहे. ‘जनादेशाच्या खुल्या अपहरणाच्या युगात आपण पोहोचलो आहोत की काय?’ असा सवाल प्रियंका यांनी केला आहे. ‘भाजपाने महाराष्ट्रात देशाची राज्यघटना व घटनात्मक संस्थांना ठेंगा दाखवून कर्नाटकातील सत्तेच्या खेळाची पुनरावृत्ती सुरू केली आहे, असे टीव्हीवर पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात 12 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्यासाठी भाजपा सरकारच्या खिशातून कधी मदत निघाली नाही’ असे ट्विटमध्ये म्हटले आहे.