सातारा (प्रतिनिधी) – करोनाला रोखण्यासाठी सुरू असणाऱ्या लॉकडाऊन काळात सातारा जिल्ह्यातून बाहेर जायचे आहे किंवा सातारा जिल्ह्यात यायचे आहे, अशा नागरिकांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने भाजपच्या वतीने स्थलांतर सहाय्यता समिती स्थापन करण्यात येत आहे, अशी माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली.
स्थलांतर सहाय्यता समितीचे मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर काम पाहतील. शहराध्यक्ष विकास गोसावी त्यांना सहायक म्हणून काम पाहतील. समिती प्रमुख विठ्ठल बलशेठवार असतील तर इतर जबाबदाऱ्या पुडीलप्रमाणे आहेत. अत्यावश्यक व वैद्यकीय व्यक्तींना पास- विक्रम बोराटे व स्वप्नील बोराटे, ई पास देण्याची कार्यवाही- संदीप वायदंडे व कृणाल मोरे, सातारा जिल्ह्यातून बाहेरच्या राज्यात किंवा जिल्ह्यात जाणाऱ्यांसाठी- जयदीप ठुसे, संतोष प्रभुणे, आप्पा कोरे, राहुल शिवनामे, अमोल कांबळे.
बाहेरच्या राज्यातून किंवा जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात येणाऱ्यांसाठी प्रवीण शहाणे. स्वतःच्या वाहनाने बाहेरच्या राज्यात किंवा जिल्ह्यात जाणाऱ्यांसाठी- विक्रांत भोसले, गणेश पालखे, सुधीर काकडे. संबिधितांनी या समितीबरोबर संपर्क साधून आपल्या भागातील स्थलांतर करणाऱ्या व्यक्तींना सहकार्य करावे, असे आवाहनपावसकर यांनी केले आहे.