नवी दिल्ली – बिहारमध्ये सत्तेवर असणाऱ्या भाजप आणि जेडीयू या मित्रपक्षांमध्ये उत्तरप्रदेशात फारकत झाली आहे. ते पक्ष उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार आहेत.
उत्तरप्रदेशात एकत्रपणे लढण्याचा प्रस्ताव आम्ही दिला होता. मात्र, भाजपकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती जेडीयूचे अध्यक्ष ललन सिंह यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
जेडीयू उत्तरप्रदेशात 51 जागा लढवणार आहे. त्या राज्यात जेडीयूचा फारसा प्रभाव नाही. त्यामुळे भाजपने एकत्र येण्याचा प्रस्ताव फेटाळल्याचे समजते. दरम्यान, उत्तरप्रदेशात स्वतंत्रपणे लढणार असलो तरी बिहारमधील आमच्या मैत्रीवर परिणाम होणार नाही, असेही सिंह यांनी स्पष्ट केले.