लखनऊ – भाजप सरकार सध्या काँग्रेसच्या वाटेवर चालत आहे. भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात अराजकता आणि तणावाची परिस्थिती आहे, अशी टीका बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी केली. मायावतींनी आज आपल्या वाढदिनी काँग्रेस-भाजपवर टीकास्त्र डागले.
मायावती म्हणाल्या कि, तत्कालीन काँग्रेस सरकारने ज्याप्रमाणे गरीब आणि दलितविरोधी योजना बनविल्या. त्यामुळे जनतेने त्यांना सत्तेपासून वंचित केले. आता भाजपही त्याच वाटेवर चालत आहे. देशाची अर्थव्यवस्थेला अनेक समस्यांनी घेरले आहे. देशात तणावाचे वातावरण आहे. केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील गरीब जनता नाराज आहे. भाजप आणि काँग्रेस दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एवढेच नव्हेतर भाजप काँग्रेसच्या दोन पावले पुढे आहे.
काँग्रेसमुळे भाजप सत्तेत आली. आणि आता भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे काँग्रेस अँड कंपनी पुन्हा सत्तेत येण्याचे प्रयत्न करत आहे. अशात बसपा गरिबांच्या समस्या-वेदना समजते. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढाई करते, असेही मायावतींनी म्हंटले आहे.
Bahujan Samaj Party (BSP) Chief Mayawati: BJP led Central govt is also following the path of Congress party. It is misusing its powers for political gains. Wrong policies of govt has led to disturbance&law&order situation across the country, which is a matter of national concern. pic.twitter.com/k76Sef0SSh
— ANI UP (@ANINewsUP) January 15, 2020
दरम्यान, मायावतींनी नोटबंदी, जीएसटी, सीएए, एनआरसी आणि एनपीआर यासारख्या मुद्यांवरूनही भाजप सरकारवर टीका केली आहे.