नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या संकटाने संपूर्ण जग हादरून गेलेलं असताना भारतातही या व्हायरसने शिरकाव केला आहे. असतांना कोलकातामध्ये भाजपचा स्थानिक कार्यकर्ता नारायण चटर्जी (४० वर्ष) यांनी सोमवारी गोशाळेमध्ये गो पुजाचे आयोजन करत गोमूत्र सेवन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यांनी या कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले आहे.
दरम्यान, गोमूत्र प्यायल्याने कोरोना विषाणूची लागण होत नाही. तसंच ज्याला कोरोनाची लागण झाली आहे ती व्यक्ती सुध्दा बरी होते असा दावा नारायण चटर्जी याने केला होता. कार्यक्रमात एक व्यक्ती सहभागी झाली होती.
या व्यक्तीने गोमूत्र प्यायले आणि मंगळवारी ही व्यक्ती आजारी पडली. त्यानंतर त्याने स्वत: पोलिस ठाण्यात जाऊन भाजप कार्यकर्ता चटर्जीं विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी चटर्जींना अटक केली. तत्पूर्वी, आपल्या देशात कोरोनाचा काहीही परिणाम होणार नाही. कारण येथे ३३ करोड देवी-देवता राहतात. या विधानामुळे कैलास विजयवर्गीय काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले होते.