नवी दिल्ली : आज देशभरात कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी पाकिस्तान आणि चीन यांना इशारा दिला आहे. पुर्ण जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे. तसेच पाकव्याप्त काश्मिर आणि अक्साई चीन यांच्यावरील नियंत्रणासंबंधी जो काही निर्णय आहे तो देशातील सरकारच्या आदेशानेच घेण्यात येणार असल्याचे बिपीन रावत यांनी म्हटले आहे.
कारगिल विजल दिवसाच्या पार्श्वभूमीवर बोलत असताना त्यांनी पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीनविषयी मत व्यक्त केले. पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीनचा जो भाग भारताचा नाही तो कसा मिळवायचा याचा संपूर्ण निर्णय देशातील सरकारने घ्यावे तसेच त्यासंबंधीचे आदेश सैन्यास देण्यात यावे असे रावत यांनी यावेळी म्हटले. एवढेच नाही तर त्यांनी जम्मू-काश्मिरच्या तरुणांच्या दहशतवादी बनण्याच्या प्रक्रियेवरही बोलताना, जम्मूत जो तरुण दहशतवादी होण्यासाठी हातात बंदुक घेवून सैन्याच्या विरोधात जाईल त्याला ठार करण्यात येईल आणि त्याची बंदूक आमच्या हातात येईल असे म्हटले. जम्मुतील तरुण आणि बंदुक एकत्र कधीच येवू शकत नसल्याचेही यावेळी रावत यांनी स्पष्ट केले.