नवी दिल्ली – आयआयटी मुंबई येथे आज इलेक्ट्रिक मोबिलिटी या विषयावरील ब्रिक्स नेटवर्क विद्यापीठांच्या तीन दिवसीय आभासी परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.यावर्षी तेराव्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या अध्यक्षतेखाली शिक्षण परिषद अंतर्गत भारत आयोजित करत असलेल्या कार्यक्रमांचा हा एक भाग आहे.
ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका येथील अठरा तज्ञ आगामी तीन दिवसांत वाहतूक व्यवस्थापन, हायड्रोजन तंत्रज्ञान, संकरित वाहने, लिथियम-आयन बॅटरी आणि ई-मोबिलिटीआणि जीवनमान यांच्यातील संबंध इत्यादी इलेकट्रीक मोबिलिटीच्या विविध पैलूंबद्दल चर्चा करतील.या परिषदेत पाच सदस्य देशांच्या ब्रिक्स नेटवर्क विद्यापीठातील 100 हून अधिक विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
ट्रक ते ई-रिक्षा, सायकली, ई-कार्टस आणि ई-फूड स्टॉल्सपर्यंतच्या सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये जैव-इंधनाच्या वाढत्या वापरामुळे भारतातील वाहतूक क्षेत्रात वेगाने परिवर्तन होत आहे.कमी किमतीच्या बॅटरी तंत्रज्ञानाच्या बाबतीतही देशाने बरीच प्रगती केली असल्याचे केंज्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.
हे परिवर्तन केवळ शाश्वत पर्यावरण आणि आरोग्यासाठीच चांगले नाही तर देशातील उपजीविकेचे नवे मार्गही खुले करीत आहे.ई-मोबिलिटीत आणखी क्रांती आणण्यासाठी , श्री गडकरी यांनी देशातील आय.आय.टी. ना नवीन तंत्रज्ञानाचे संशोधन करण्याचे आवाहन केले. या क्षेत्रामध्ये ब्रिक्स देशांमध्ये अधिकाधिक संशोधन सहकार्य करावे, असेही मंत्र्यांनी सांगितले.