नवी दिल्ली – बिहारमध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान बुधवारी होणार आहे. यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीकेची तोफ डागली. बिहारचे सत्ताधीश अहंकारात बुडून गेले असून आता या सरकारला बदलण्याची वेळ आली आहे, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली आहे.
सोनिया गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर करत केंद्र सरकारच्या अपयशापासून ते बिहार सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला आहे. तसेच यामधून बिहार आणि केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला चढवला आहे.
‘बदलाव की बयार है।’
कांग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी जी का बिहार की जनता के नाम संदेश आपसे साझा कर रहा हूँ।
नए बिहार के लिए एकजुट होकर महागठबंधन को जीताने का समय है। pic.twitter.com/ptmzjEjQuh
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 27, 2020
सोनिया गांधी म्हणाल्या कि, बिहारचे सत्ताधीश अहंकारात बुडाले असून विकासाच्या मार्गावरून भरकटले आहेत. नितीशकुमार सरकारने जनतेवर केवळ ‘बंदी’ लादण्यापलिकडे काहीही केले नाही. नोटाबंदी, टाळेबंदी, व्यापारबंदी, आर्थिकबंदी, कृषीबंदी, रोजीरोटी-रोजगार बंदी करण्यावरच या दोन्ही सरकारांचा भर राहिला आहे. त्यामुळे कामगार असहाय्य असून शेतकरी वर्गही चिंतेत आहेत. तर तरुण वर्गही निराश आहे.
याविरोधात बिहारमधील जनता एकजूट झाली असून काँग्रेस महाविकास आघाडीसोबत उभी आहे. आता बदल करण्याची वेळ आहे. नव्या भारताचा अध्याय लिहिण्याची हीच योग्य वेळ असल्याचेही सोनिया गांधी यांनी म्हंटले आहे.