पाटणा – बिहारच्या औरंगाबादमध्ये हुंड्याच्या हव्यासापोटी तिसर्या पत्नीची कट रचून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हत्येचा आरोप असलेल्या पतीची ही तीसरी पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण उपरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेखपुरा गावातील आहे. सुबेलाल पासवान असे पत्नीची हत्या केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. त्याने तीन विवाह केले होते, ज्यामध्ये पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला होता, तर दुसरी नातेवाईकासोबत पळून गेली होती आणि तिसऱ्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप सुबेलालवर आहे.
तिसरी मृत पत्नी चंद्रावतीच्या आईच्या फिर्यादीवरून उपा पोलिस ठाण्यात सुबेलालवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंड्यासाठी चंद्रावतीची हत्या केल्याचा आरोप सुबेलालवर आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुबेलालचे 2002 मध्ये लालती नावाच्या मुलीसोबत पहिले लग्न झाले होते. त्यानंतर चार वर्षातच 2004 मध्ये तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही वर्षांनी ममता नावाच्या मुलीसोबत दुसरा विवाह झाला. लग्नानंतर काही महिन्यांनी तो ममताला दमणला घेऊन गेला, तिथे त्याने एका खासगी कंपनीत काम करायला सुरुवात केली. अनेकदा ममता आणि सुबेलालचे भांडत होत असे. शेवटी सततच्या वादाला कंटाळून ममता तिच्या एका नातेवाईकासोबत पळून गेली.
यानंतर सुबेलालने 2018 मध्ये चंद्रावतीशी तिसरे लग्न केले, ज्यामध्ये त्याच्या कुवतीनुसार हुंडाही देण्यात आला. मात्र हुंडा कमी दिल्यामुळे तो नाराज होता आणि पत्नीला सतत मारहाण करत असे, शेवटी रागाच्या भरात त्याने पत्नीची हत्या केली आणि पुरावा लपवण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळला. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसरीकडे तिसर्या पत्नीच्या हत्येचा तपास योग्य पद्धतीने झाला तर सुबेलालच्या हुंड्याच्या हव्यासापोटी हत्या केल्याचे रहस्य उलगडू शकेल, असे लोकांचे म्हणणे आहे.