नवी दिल्ली – बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदानोत्तर चाचण्यांवरील (एक्झिट पोल) बंदीचा कालावधी निश्चित केला आहे. त्यानुसार, 28 ऑक्टोबरच्या सकाळी 7 पासून ते 7 नोव्हेंबरच्या सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत मतदानोत्तर चाचण्या घेता येऊ शकणार नाहीत आणि त्यांचे प्रसारण करता येऊ शकणार नाही.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 28 ऑक्टोबरला मतदान होईल. पुढील दोन टप्प्यांसाठी 3 आणि 7 नोव्हेंबरला मतदार त्यांचा हक्क बजावतील. त्या निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.
ऐन करोना संकटकाळात होणारी बिहारची रणधुमाळी देशातील पहिलीच महत्वाची निवडणूक आहे. बिहारबरोबरच काही राज्यांत विधानसभा पोटनिवडणुकाही होणार आहेत.