नवी दिल्ली – बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एक मोठी घोषणा केली आहे. गुरुवारी पूर्णिया येथे आयोजित प्रचारसभेत ते म्हणाले की, ही माझी शेवटची निवडणूक आहे, शेवट चांगला तर सर्वकाही चांगलं.
नितीशकुमार म्हणाले, ‘आज निवडणुक प्रचाराचा शेवटचा दिवस आणि परवा निवडणूक आहे, ही माझी शेवटची निवडणूक आहे. शेवट चांगला तर सर्वकाही चांगलं ‘
This is my last election, says Bihar CM and JD(U) Chief Nitish Kumar during an election rally in Purnia#BiharElections2020 pic.twitter.com/Hthwem3XmS
— ANI (@ANI) November 5, 2020
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीचे तिसर्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान शनिवारी होणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज 15 जिल्ह्यातील 78 जागासाठी निवडणुकीच्या प्रचारासाठी अखेरचा दिवस आहे. अशामध्ये सर्व राजकीय पक्ष आपल्या उमेदवारासाठी पूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत.