पाटणा – बिहारमध्ये विषारी दारू पिल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 7 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना जीतन राम मांझी यांच्या विधानसभा मतदारसंघाजवळील अमास येथील पाथरा गावातील आहे. अमर पासवान (वय 30), अर्जुन पासवान (वय45) अशी मृत्यू पावलेल्या काका-पुतण्याची नावे आहेत.
इतर गंभीर बाधितांना गया येथील अनुग्रह नारायण मगध वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदीमुळे विषारी दारूच्या व्यापाऱ्यांची चांदी होत आहे. तर दुसरीकडे विषारी दारू पिऊन अनेकांचा मृत्यू होत आहे. बिहारमधील मद्य धोरणात सातत्याने सुधारणा करूनही परिस्थिती सुधारलेली नाही.
गया रूग्णालयात जीवन-मरणाच्या चौकटीत वावरणार्या रूग्णांचे नातेवाईक चिंतेत आहेत. विषारी दारूमुळे अमर आणि अर्जुन यांचा मृत्यू झाला असून अजय पासवान, बसंत यादव, लालदेव यादव, सुमन पासवान, हरेंद्र पासवान, कैलाश यादव आणि संजय यादव यांची प्रकृती गंभीर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सर्वांनी दारू प्यायली. त्यानंतर रात्री अचानक त्यांची तब्येत बिघडू लागली. त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. जिथे उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी लागू आहे, पण ग्राउंड रिअॅलिटी काहीतरी वेगळेच सांगत आहे. यामुळेच विषारी दारू पिल्याने मृत्यूची साखळी थांबण्याचे नाव घेत नाही.