पाली : रस्ते अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहेत. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये बरलाई गावानजिकच्या राष्ट्रीय महामार्गावर मार्बलने भरलेला एक कंटेनर अनियंत्रित होऊन चालत्या कारवर कोसळला.
या भीषण अपघातात, कारचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातात कारमधील चौघांचा दबून मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कारमधील लोक जोधपूरहून अहमदाबादच्या दिशेनं निघाले होते. मात्र कारमधील चौघांवर काळाने घाला घातला आहे. या अपघातामुळे पाली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलीसांनी क्रेनच्या सहाय्याने कारवर कोसळलेला कंटेनर बाजूला केला. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी पालीवरुन सिरोही राष्ट्रीय महामार्गावर बारलाई गावाजवळ कार RJ 19 UO 9226 पालीवरुन सिरोहीला निघाली होती. तेव्हा गुजरात नंबर GJ 12 BT 3880 कंटेनर ट्रोला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न कारवर जाऊन पडला. कंटेनरमध्ये मार्बल भरलेल्या होत्या. त्यामुळे कंटनेर कारवर कोसळताच कार अक्षरश: चपटी झाली होती.