नवी दिल्ली – पंजाब नॅशनल बॅंकेचे अब्जावधी रूपयांचे कर्ज बुडवून विदेशात पळालेला व्यापारी मेहुल चोकसीला लवकरच आणण्यात येणार आहे. सध्या चोकसी अँटिग्वामध्ये वास्तव्याला आहे. लवकरच चोकसीचे नागरिकत्व रद्द करणार असल्याचे अँटिग्वाच्या पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांनी म्हंटले आहे. यासाठी भारताकडून बराच दबाव आणला जात असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. हे मोदी सरकारचे मोठे यशच आहे.
नीरव मोदी आणि मेहुल चोकसीवर १३ हजार कोटी घोटाळा केल्याचा आरोप आहे. तेव्हापासून विरोधी पक्षांनी या प्रकरणावरून सरकारला घेरले होते. परंतु, आता मेहुल चोकसीचा घरवापसीचा मार्ग मोकळा झाला आहे. अँटिग्वाच्या पंतप्रधानांनी दिलेल्या माहितीनुसार, चोकसीचे नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून लवकरच त्याला भारताच्या ताब्यात देण्यात येईल. कोणत्याही प्रकारचे आरोप असलेल्या व्यक्तीला देशात थारा देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
Govt sources on reports on Mehul Choksi: India waits for Antigua’s internal process of revoking citizenship.Only after that extradition process can start separately. India continues to engage with Antigua.MEA yet to hear officially from Antiguan govt about revoking of citizenship pic.twitter.com/WqZVNx5zRW
— ANI (@ANI) June 25, 2019