पुणे: राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत. राज्यातील जनतेने महायुतीला बहुमत दिले असले तरी भाजप सेनेत युतीबद्दल बेबनाव असल्याचेच चित्र पाहायला मिळतेय. तर दुसरीकडे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येत सत्ता स्थापन करतील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सेना युती बद्दलच्या चर्चाना जवळपास पूर्णविराम मिळाला आहे.
प्रफुल्ल पटेल म्हणाले,”मी सांगू इच्छितो की, आम्ही विरोधी पक्षात असणार आहोत आणि सक्षम विरोधी पक्षांची भूमिका निभावणार आहेत. आम्हाला सरकार स्थापनेत कोणतीही भूमिका घ्यायची नाही, भाजप-शिवसेनेला जनतेने कौल दिला आहे. आणि आम्हालाही तो कौल मान्य आहे, म्हणून युतीला सत्ता स्थापनेसाठी शुभेच्छा.”
Praful Patel,NCP: I want to make it clear that we will be in opposition and play the role of a strong opposition. We don’t want to have any role in Govt formation, BJP-Shiv Sena have got the mandate,so best wishes to them. #MaharashtraAssemblyPolls2019 pic.twitter.com/BAynSPAB78
— ANI (@ANI) October 26, 2019
दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा-शिवसेना युतीला वर्चस्व मिळाले आहे. मात्र, भाजपा आणि शिवसेनेच्या जागा यंदाच्या निवडणुकीत घटल्या आहेत. तुलनेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चांगले यश संपादन केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवडणुकीतील झंझावती दौऱ्यामुळे राष्ट्रवादीने अर्धशतक पार करत 54 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीने 54 तर काँग्रेसनेही फिफ्टी मारत 52 जागांवर विजय मिळविला केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचाच विधानसभेतील विरोधी पक्षनेता होणार हे स्पष्ट आहे.