नवी दिल्ली – गोवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी आमची युती होऊ शकली नाही पण हे पक्ष आमचे मित्र पक्षच आहेत आणि आमच्यातील मैत्री कायम राहील असे प्रतिपादन ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व गोव्यातील प्रभारी पी. चिदंबरम यांनी केले आहे.
गोव्यात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करायचा की नाही या विषयी उमेदवारांशी चर्चा करून सर्वसहमतीने निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले.
ते म्हणाले की गोव्यात खरी लढत भाजप आणि कॉंग्रेस यांच्यातच होईल आणि त्यात कॉंग्रेस पक्षाला साधे बहुमत निश्चीत मिळेल. तृणमुल कॉंग्रेसच्या संबंधात बोलताना ते म्हणाले की त्यांनी आमच्या नेत्यांचीच शिकार केली आणि नंतर त्यांनीच आम्हाला युती करण्याचा प्रस्ताव दिला. त्यामुळे त्यांच्याशी आघाडी न करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.