नवी दिल्ली – इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात भारतीय संघ 2-1 अशा फरकाने पिछाडीवर आहे. त्याचबरोबर या तीन सामन्यात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने आपल्या नावाला साजेशी कामगिरी केलेली नाही. त्यामुळे आता पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीज राजाने हार्दिक पंड्यावर निशाणा साधताना एक वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की हार्दिक पंड्या वेगाने धावा काढू शकला नाही. त्यामुळे संपूर्ण भारतीय संघाला नुकसान होत आहे.
माजी खेळाडू रमीज राजाने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाला, “हार्दिक पंड्याची बॅट चालेना झाली आहे. इंग्लंडचे गोलंदाज त्याला खूप बाउंसर टाकत आहेत. त्यांना माहित आहे की, हार्दिक पंड्याला फुल किंवा फिरकी गोलंदाजी करू शकत नाही. त्यामुळे ते सातत्याने शॉर्ट-ऑफ-गुड लेंथ गोलंदाजी करत आहेत.”
रमीज राजा पुढे म्हणाला, “पंड्याला अशाच शॉर्ट पिच गोलंदाजी विरुद्ध खेळताना अडचण येत आहे. तो ज्या प्रकारचा फलंदाज आहे. त्याप्रमाणे 20 चेंडूत 17 धावा खूपच कमी वाटतात. तो तिथून आधार बनवतो आणि विरुद्ध संघावर दमदार आक्रमण करून धावा करतो. त्याने वेगाने धावा न करणे या कारणामुळे संपूर्ण भारतीय संघाला नुकसान होत आहे. ”
इंग्लंड विरुद्ध झालेल्या पहिल्या आणि तिसर्या सामन्यात हार्दिक पंड्याने अनुक्रमे 19 व 17 धावा केल्या होत्या. मात्र दुसर्या सामन्यात त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. भारत आणि इंग्लंड संघात आज चौथा टी-20 सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला मालिकेत बरोबरी करण्यासाठी विजय आवश्यक आहे.