इंदूर : इंदूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. बस पुलावरुन खाली कोसळून झालेल्या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर, 12 ते 15 जण बेपत्ता झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. अपघातग्रस्त बसला क्रेनच्या मदतीने नदीबाहेर काढण्यात आले आहे.
मध्य प्रदेशातील धार येथे हा अपघात झाला आहे. बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली असल्याचे म्हटले जात आहे. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात आले आहे.
अपघातग्रस्त बस ही महाराष्ट्र एसटी मंडळाची होती. धार येथून ही बस पुण्यासाठी येत होती. खालघाट परिसरात असताना एसटी बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरु कऱण्यात आले आहे. या बसमध्ये ५० ते ६० प्रवासी होते अशी माहिती आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.