मुंबई – बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने कालच आपला ५६ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्ताने आमिरच्या चाहत्यांनी त्याला भरभरून शुभेच्छा देखील दिल्या. मात्र आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्वीकार करताना आमिर खानने एक धक्कादायक घोषणा केली आहे.
आमिरने याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक संदेश पोस्ट केला असून यामध्ये त्याने आपण सोशल मीडियाचा वापर पूर्णपणे थांबवणार असल्याचं म्हटलंय.
आमिरने आपल्या सोशल मीडिया सोडण्याच्या निर्णयाचे कारण देखील सांगितले आहे. आपल्या कामावर अधिक लक्ष देता यावं यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं आमिरने इंस्टाग्रामवर लिहलेल्या पोस्टमध्ये सांगितलंय. आमिर अशाप्रकारे सोशल मीडियाला अलविदा करेल असा कोणी विचारही केला नसेल मात्र त्याने हा निर्णय घेतला आहे.
याआधी देखील त्याने ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्राधान्य देता यावं यासाठी आपला मोबाईल फोन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
View this post on Instagram