चैन्नई – तमिळ चित्रपटसृष्टीतील महानायक ‘रजनीकांत’ (rajinikanth) यांनी आपण आपला स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र, रजनीकांत यांनी आपल्या प्रकृतीचे कारण देत ‘आपण राजकारणात उतरणार नसल्याची घोषणा केली’. त्यामुळे थैलावा यांनी डाव मांडण्या अगोदर तो डाव मोडल्याने त्यांच्या चाहत्यांचा चांगलाच हिरमोड झाला.
3 डिसेंबर रोजी रजनीकांत (rajinikanth) यांनी आपण पुढील वर्षी तामिळनाडूची विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती आणि 31 डिसेंबरला आपल्या पक्षाची ते घोषणा करणार होते. तेव्हा त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले होते. तेव्हा तामिळनाडू राजकारणही चांगलेच ढवळून निघाले होते.
Actor Rajinikanth says, he will continue to work for people https://t.co/sufKxYejYW pic.twitter.com/p9ab7pPwsD
— ANI (@ANI) December 29, 2020
पण, तरीही त्यांनी सक्रीय राजकारणात यावं, असाच आग्रह त्यांच्या असंख्य चाहत्यांकडून होत आला. किंबहुना काही चाहते आणि समर्थकांनी तर, यासाठी चेन्नईतील वल्लुवर कोट्टम येथे हीच मागणी उचलून धरत एक आंदोलनही केलं. ज्यानंतर अखेर संपूर्ण परिस्थिती पाहून खुद्द रजनीकांत (rajinikanth) यांनीच काहीशी नाराजी व्यक्त करत ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांना एक आवाहन केलं आहे.
— Rajinikanth (@rajinikanth) January 11, 2021
रजनीकांत (rajinikanth) म्हणाले कि, “माझ्या नेतेपदासाठी आंदोलनात सहभागी न झालेल्यांचे मी मनापासून आभार मानतो. मी यापूर्वीच राजकारणात प्रवेश का, करत नाही याबाबतची कारणं स्पष्ट केली आहे. मी माझा निर्णय़ही सांगितला आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंतीच करतो की, माझ्या राजकीय प्रवेशाचीच मागणी करण्यासाठी अशा प्रकारची आयोजनं करु नका आणि मला आणखी वेदना देऊ नका.! या आशयाचे ट्विट रजनीकांत यांनी केलं आहे.
रजनीकांत हे ब्लड प्रेशरच्या समस्येमुळे हैदराबाद येथील अपोलो रूग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर रजनीकांत यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज देतेवेळी डाॅक्टरांनी रजनीकांत यांना आरोग्यसंदर्भात कोणतीही गंभीर समस्या नसल्याचे सांगितले आहे.