मुंबई – राज्यात दोन ठिकाणी सोन्याच्या खाणी सापडल्या असल्याची माहिती, खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी याबद्दल उल्लेख केला आहे. विदर्भातील वन्यजीव क्षेत्रातील जमिनीत सोन्याचे साठे सापडले असून, नव्यानं सापडलेल्या या सोन्याच्या खाणी राज्याच्या फायद्याच्या असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सध्या स्वतः मुख्यमंत्री यांनी या दृष्टीने शोध घेण्याचं काम सुरु केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील “मिंझरी आणि बामणी’ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या भागात भूर्गभात सोन्याचे दोन ब्लॉक म्हणजेच, खाणी आढळून आल्या आहेत. या भागात भूर्गाभात तांबेही असून या भागातून सोनेही मोठ्या प्रमाणात मिळू शकते, असे संकेत केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागाच्या अहवालानुसार सांगण्यात आलं आहे. आणि याच दृष्टीने आता पुढील आणखी चाचणी सुरु करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणले की, “राज्याच्या भूगर्भात कोळसा, बॉक्साईट, आर्यन या खनिजांसोबत सोनंही असू शकतं, असं आता बोललं जातंय. याबाबत केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागाचा अहवाल असल्याचंही सांगितलं जातंय. या दृष्टीने आता चाचणीही सुरु करण्यात आल्याचं कळतंय. असं ते म्हणाले.
तसेच पुढे ते म्हणाले, राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरू करून या व्यवसायातील अडचणी दूर करून राज्याच्या महसुलासह रोजगारात वाढ झाली पाहिजे, असही मुख्यमंत्री म्हणाले.