नवी दिल्ली – जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. जगाला शांतता आणि प्रगतीचा मार्ग दाखवून भारताचे नेतृत्व करणारे पंतप्रधान मोदी केवळ आपल्या देशाचा ध्वज जगभरात फडकवत नाहीत. तर त्याच्या गुणवत्तेची प्रशंसा करणाऱ्यांमध्ये नोबेल पारितोषिक समितीच्या सदस्याचेही नाव समाविष्ट करण्यात आले आहे.
गेल्या ९ वर्षांपासून मोदी जागतिक स्तरावर देशाचे नेतृत्व करत आहेत. आता चक्क शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, नोबेल पारितोषिक समितीची टीम नॉर्वेहून भारतात आली आहे. हीच समिती शांतता पुरस्कार विजेत्याचा निर्णय घेते आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या समितीच्या उपनेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींसारख्या शक्तिशाली नेत्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्याची प्रचंड क्षमता आहे. अशात लवकरच भारतीयांना नोबेल पुरस्काराशी संबंधित काही मोठी बातमी ऐकायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नोबेल शांतता पुरस्कार कोणाला दिला जातो
नोबेल शांतता पुरस्कार जगभरातील निवडक व्यक्तींना दिला जातो, “ज्यांनी लष्करी तैनाती कमी करण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी किंवा प्रोत्साहन देण्यासाठी देशांमध्ये सर्वात उल्लेखनीय कार्य केले आहे.”