नवी दिल्ली : इंधन दरवाढ आणि भारत-चीन सीमावादावरुन सध्या देशात चांगलच राजकारण सुरु आहे. भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) सर्वोसर्वा मायावती यांनी भाजपाच्या भूमिकेला पाठींबा दर्शवला आहे.
Politics being done by BJP and Congress by levelling accusations at each other over India-China border issue is not in the interest of the nation. It is a matter of great concern: BSP Chief Mayawati https://t.co/tMRjFboSvg
— ANI (@ANI) June 29, 2020
भाजपा आणि काँग्रेसच्या राजकारणावर मायावती यांनी टीका केली आहे. यावेळी त्यांनी चीनच्या मुद्द्यांवर सध्या देशात काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपांचे घाणेरडे राजकारण सुरु आहे. सध्याच्या काळात ते आजिबात योग्य नाही. यांच्या आपसातील लढाईमध्ये सर्वाधिक नुकसान देशाच्या जनतेचं होतं आहे. यांच्या परस्परांच्या लढाईत जनहिताचे मुद्दे दाबले जात आहेत. ही अत्यंत चिंतेची बाब आहे.
एकीकडे देशातील नागरिक कोरोनाच्या महामारीमुळे आधीच अडचणींचा सामना करीत आहे. तर दुसरीकडे सातत्याने इंधनाच्या किंमतीत वाढ होत असल्याने याची देखील नागरिकांच्या अडचणीत अधिकच भर पडत आहे. केंद्र सरकारने लवकरात लवकर देशातील इंधनाचे दर नियंत्रणात आणावेत, अशी मागणीही मायावती यांनी केली आहे.