चंदीगड – पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला आहे. पंजाब विधानसभा निवडणुकांच्या आधीच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
ज्या शेतकऱ्यांची 5 एकर पर्यंत जमीन आहे त्या शेतकऱ्यांना 2 लाख रूपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. पंजाब सरकारने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी 10 दिवसांत होणार असल्याचे चन्नी यांनी सांगितले.
दरम्यान, 2 लाख रुपयांपर्यंचे कर्ज माफ करण्याच्या निर्णयासोबतच भूमीहीन मजुरांचे देखील कर्ज माफ केले असल्याचे मुख्यमंत्री चन्नी म्हणाले.पंजाब सरकारने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.