अहमदाबाद – करोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशाभोवती आपला विळखा घट्ट केला आहे. रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याने अनेक राज्यांमधील आरोग्यव्यवस्था मोडकळीस आल्या असून बाधित रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन व औषधांचा पुरवठा करणे देखील अवघड झालंय.
अशा परस्थितीमध्येच हरिद्वार येथे कुंभमेळा सुरु असून येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी उपस्थिती लावत आहेत. ही गर्दी करोना संक्रमणास हातभार लावेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता गुजरात सरकारने कुंभमेळ्यास उपस्थिती लावून राज्यात परतणाऱ्या भाविकांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
कुंभमेळ्यातून परतणाऱ्या नागरिकांना थेट त्यांच्या जिल्यांमध्ये अथवा गावांमध्ये जाऊ दिले जाणार नाही. त्या सर्व भाविकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येईल. बाधित आढळलेल्या भाविकांना १४ दिवसांसाठी विलगीकरणात ठेवले जाईल. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
All devotees of Gujarat who went to Kumbh Mela will not be given direct entry to their village on their return. All ppl will be tested for RTPCR. Ppl found infected will be kept in isolation for 14 days. Orders issued to all District Collectors: Gujarat CM Vijay Rupani (File pic) pic.twitter.com/Rc320LV7j2
— ANI (@ANI) April 17, 2021