नवी दिल्ली – केंद्राने लागू केलेले कृषी कायदे रद्द करण्यात यावे या प्रमुख मागणीसह गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी ठिय्या मांडून बसले आहेत. मात्र शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या या आंदोलनाला काल आंदोलकांतर्फे काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसक वळण लागले. कालच्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलनामध्ये आज उभी फूट पडल्याचं पाहायला मिळतंय.
आंदोलनामध्ये सामील असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने आंदोलनातून माघार घेत असल्याचा निर्वाळा केलाय. याबाबत संघटनेचे व्ही एम सिंग यांनी पत्रकारपरिषदेमध्ये बोलताना, शेतकरी नेते राकेश टिकैत यांचे इरादे वेगळेच असून अशा परिस्थितीत आम्ही आंदोलनातील सहभाग पुढे कायम ठेऊ शकत नाही असं म्हटलंय.
I have nothing to do with the protest which is being led by them and over here being represented by Rakesh Tikait on their behalf: Sardar VM Singh, Rashtriya Kisan Mazdoor Sangathan https://t.co/CYKZoH9y4y
— ANI (@ANI) January 27, 2021
याखेरीज भारतीय किसान युनियन (भानू) या संघटनेने देखील हिंसाचारानंतर आंदोलनातून माघार घेत असल्याचं जाहीर केलंय. संघटनेचे नेते ठाकूर भानू प्रतप सिंग यांनी याबाबत घोषणा करताना, ‘कालच्या हिंसाचारानंतर आम्ही अत्यंत दुखी असून आम्ही आमचे ५८ दिवसांचे आंदोलन मागे घेत आहोत’ असं सांगितलं.
I am deeply pained by whatever happened in Delhi yesterday and ending our 58-day protest: Thakur Bhanu Pratap Singh, president of Bharatiya Kisan Union (Bhanu) at Chilla border pic.twitter.com/5WNdxM9Iqo
— ANI UP (@ANINewsUP) January 27, 2021