मुंबई- सध्या सगळीकडे बिग-बॉसचे वारे सुरु आहे. बिग बॉसचे यशस्वीरित्या 13 सिझन पार पडले. 14व्या सिझनसाठी सगळे सज्ज झाले आहेत. मात्र मागील 13 सिझनमध्ये आपण प्रचंड ड्रामा बघितला भांडणं बघितला आणि प्रेमही बधितलं. बिग-बॉसच्या घरात अनेकांनी आपल्या जोडीदाराचीही निवड केली होती. मात्र ते सगळे आता काय करतात? त्यांचं प्रेम टिकलं का? बिग-बॉस संपल्यानंतर त्या सगळ्या कपल्सचं काय झालं. पाहूया…
किशोर व्यापारी आणि सुय्यश राय
या दोघांनी हिट टीव्ही शो प्यार की ये एक कहानीच्या सेटवर एकत्र आले होते. मैत्री वाढली त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर हे दोघे बिग बॉसच्या नवव्या सिझनमध्ये एकत्र आले. बिग-बॉसमध्येही त्यांनी त्यांचे नाते खराब होऊ दिले नाही. अखेर त्यांनी 2016 मध्ये विवाह केला.
रोशेल राव आणि कीथ सिक्वेरा
या दोघांची भेट बिग-बॉसच्या घरात येण्याअगोदरच झाली होती. त्यांच्यातील मैत्री त्यांनी पुढे नेण्याचं ठरवलं. काही महिने डेटिंग केल्यानंतर या दोघांनी एकत्र बिग बॉसच्या नवव्या सिझनमध्ये प्रवेश केला. या दरम्यान त्यांची जवळीक वाढली. त्यानंतर जोडप्याने 2018 मध्ये मित्रमंडळींना सोबत घेत लगीन गाठ बांधली.
3. पायल रोहतगी आणि राहुल महाजन
बिग बॉसच्या दुसऱ्या सिझनमध्ये या दोघांनी एकमेकांना मारहाण केली आणि कॅमेर्यावर बोल्ड दिसले. शो दरम्यान त्यांच्याबाबतीत अनेक चर्चा रंगल्या होत्या. सिझन संपल्यानंतरही त्यांनी त्यांच्यातील नाते उघडतीस येवू दिले नाही. राहुलची पत्नी डिंपी गांगुलीने त्यांच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर पालनेही त्यांच्यावर शारिरीक अत्याचार केल्याचा आरोप केला होता.
सारा खान आणि अली मर्चंट
दोघेही टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काम करत होते. त्यानंतर त्यांनी एकमेकांना वेळ देण्याचा निर्णय घेतला दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केलं. बिग-बॉसच्या घरात त्यांनी प्रेमाची कबूली दिली होती. मात्र बिग-बॉसचं सिझन संपल्यावर काही महिन्यातच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
गौहर खान आणि कुशल टंडन
बिग-बॉसच्या नवव्या सिझनमध्ये हे एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रेक्षकांना आणि चाहत्यांनाही ही जोडी आवडायला लागली होती. बिग-बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर काही काळ ते दोघेही एकत्र होते. मात्र काही कुटुंबीय मतभेदांमुळे त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. असं असलं तरी देखील ते चांगले मित्र आहेत.
अश्मित पटेल आणि वीणा मलिक
हे दोघे बिगॉ-बॉसच्या चौथ्या सिझनमध्ये एकत्र होते. अनेक कारणांमुळे ही जोडी प्रसिद्धीस आली होती. त्यांच्या शोला चांगला फायदा देखील झाला. बिग बॉसचे घर सोडल्यानंतर सुपरमॉडेल एकत्र एक चित्रपट देखील केलं. वीणा अश्मितच्या प्रेमात होती. मात्र अश्मितने याबाबत कधीच कबूली दिली नाही.
निषा मुखर्जी आणि अरमान कोहली
बिग-बॉसच्या सातव्या सिझमध्ये या दोघांनी धुमाकूळ घातला. दोघांचीही मैत्री चाहत्यांच्या पसंतीस आली. त्यांच्यातील नातं स्पष्ट झालं. सगळं सुरळीत सुरु असताना बिग-ब़ॉस संपल्यानंतर दोघे वेगळे झाले.
उपेन पटेल आणि करिश्मा तन्ना या दोघांनी डेटींगला सुरुवात केली, चाहत्यांनीही त्यांच्यावर प्रचंड प्रेम केलं. त्यानंतर नच बलिये कार्यक्रमात त्यांनी शोमध्ये सर्वापुढे प्रेमाची कबूली दिली होती. त्यानंतर दोघांनी एमटीव्हीच्या लव्ह स्कूलमध्येही धुमाकूळ घातला. मात्र त्यांचे हे संबंध फार काळ टिकू शकले नाही. अखेर 2016मध्ये दोघे वेगळे झाले.
डायंड्रा सोरेस आणि गौतम गुलाटी
या दोघांनी मिळून आठव्या सिझनमध्ये धूमाकूळ घातला होता. मात्र ते दोघे वॉशरुममधील कारनाम्यामुळे जास्त चर्चेत आले होते. त्याचा हा कारनामा ऑनएअर गेला होता. त्यामुळे दोघांनी खेद व्यक्त केला होता.
युविका चौधरी आणि प्रिन्स नरुला
बिग बॉसच्या नवव्या सिझनमध्ये दोघे एकत्र होते. प्रिन्सने विविध रिअॅलिटी टीव्ही कार्यक्रम जिंकले होते. त्यांची केमिस्ट्री पहिल्या दिवसापासूनच स्पष्ट होती. यांच्या नात्याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या नोरा फतेही सोबतसुद्धा त्यांचं नाव जोडलं गेलं होतं. या सगळ्या चर्चेनंतर नंतर मात्र 2018 मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले.
पुनीश शर्मा आणि बंडगी कालरा
अकराव्या सिझन मध्ये ही जोडी चर्चेत आली. जोडप्यांना बिग बॉसच्या घरात नातं कसं टिकवायचे यावर यांच्या चर्चाही झाल्या होत्या. बिग-बॉसच्या घरात यांच्याबाबतच्या अनेक चर्चाही रंगल्या मात्र हे दोघे ठाम होते. आक्षेप करणाऱ्यांना त्यांनी त्यावेळी पऴवून लावलं. आताही ते दोघे चांगले मित्र असल्याचं त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरुन दिसून येते.
जसलीन मथारू आणि अनुप जलोटा
बिग बॉस बाराव्या सिझनचा टीआरपी हे दोघे होते. अनुप जलोटा हे त्यावेळी प्रस्थापित नाव होतं. वयानेही बरेच मोठे असल्यानेही ते चर्चेत होते. या घरातील अनेक संबंध तेवढ्यापूरतेच असतात.त्या दोघांच्या चर्चा रंगल्या मात्र दोघांनीही त्याबाबतचा खुलासा केला नाही.
आर्यन वैद आणि अनुपमा चोप्रा
बिग बॉसच्या पहिलंसीझन या दोघांनी गाजवलं. या जोडीवर सगळ्याचं लक्ष होतं. मात्र शो संपल्यानंतर यांच्यात दुरावा निर्माण झाला.
पूजा बेदी आणि आकाशदीप सैगल
बिग बॉस 5 दरम्यान या दोघांच्या प्रेमात पडले आणि आकाशदीपने पूजाचे नावाचा टॅटू काढला होता. 2 वर्ष त्यांनी एकमेकांना डेट केलं मात्र डेटिंगनंतर दोघे वेगळे झाले त्यांनी चांगले मित्र राहणं निवडलं.
सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाझ गिल
बिग बॉसच्या इतिहासातील सिद्धार्थ आणि शहनाझ ही सर्वात लोकप्रिय जोडी होती. शो दरम्यान दोघे जवळ होते आणि तेव्हापासून एकत्रच राहिले. मात्र दोघांनीही नात्याची कबूली दिली नाही. आताही ते चांगले मित्र आहेत, असं सांगतात.
हिमांशी खुराना आणि असिम रियाज
बिग बॉसचे तेराव्या सिझनचे हे दोघे स्पर्धक होते. दोघांनी हे सिझन चांगलंच गाजवलं. प्रेक्षकांनीही त्यांना पसंती दर्शवली होती. काही काळ सोबत घालवल्यानंतर त्यांनी लग्न केलं आता ते सुखी संसारात आनंदी आहेत.