जयपुर – राजस्थानात झालेल्या पंचायत निवडणुकीत राज्यातील सत्तारूढ कॉंग्रेसला चांगलाच धक्का बसला असून या निवडणुकीत भाजपने कॉंग्रेस पेक्षा अधिक जागा मिळवल्या आहेत. पंचायत समित्यांच्या एकूण 4371 जागा आहेत त्यापैकी भाजपला 1989 जागा मिळाल्या असून कॉंग्रेसला 1852 जागा मिळाल्या आहेत. ( rajasthan election result )
439 ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. चार टप्प्यांमध्ये ही निवडणूक घेण्यात आली होती. तेथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 26 तर बहुजन समाज पक्षाला 5 जागा मिळाल्या.
जिल्हा परिषदेच्या 635 जागांपैकी भाजपला 353 आणि कॉंग्रेसला 252 जागा मिळाल्या.
भारतीय जनता पक्षाने या निकालाचा अन्वयार्थ कृषी विधयेकांच्या आंदोलनाशी जोडला आहे. भाजपचे प्रवक्ते व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीत या निकालांविषयी प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की, ग्रामीण भागातील जनता कृषी विषयक सुधारणांच्याच बाजूने आहे असे स्पष्ट करणारा हा निकाल आहे. हा कृषी विधेयकांच्या बाजुने जनतेने दिलेला कौल आहे असे त्यांनी म्हटले आहे. ( rajasthan election result )
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांचा भाजपवर जो विश्वास आहे त्याचा हा विजय आहे. शेतकरी, कामगार मजूर आणि गरीबांचा मोदींच्याच नेतृत्वावर विश्वास असल्याचे यातून दिसून आले आहे असेही नढ्ढा यांनी म्हटले आहे.