नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांनी आठ तासांपेक्षा अधिक काळ काम केल्यानंतर त्यांना या कामाचा मेहनता मिळतो. परंतु आता या संदर्भात केंद्रसरका ने मोठा निर्णय घेतला असून, हा मेहनता बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना हा मोठा दणका असल्याचे मानले जात आहे.
सरकारी कार्यालयामध्ये सर्वसाधारण कामाची वेळ ही आठ तासांची असते. मात्र अधिक पगारासाठी कर्मचारी आठ तासांपेक्षा जादा काम करतात. केंद्र सरकारच्या मानक नियमानुसार, सरकारी कर्माचाऱ्यांचा पगार हा त्याच्या कामाच्या वेळेनुसार मिळतो.
कर्मचाऱ्यांना दिले जाणारे वेतन हे दररोज आठ तास काम ग्राह्य धरूनच दिले जाते. त्यामध्ये एका महिन्यात 4 दिवस सुट्टी असते. केंद्र सरकारच्या श्रम विभागानं कर्मचाऱ्यांबाबत मोठे निर्णय घेतले आहेत, त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढू शकतात.
ड्राफ्ट प्रपोजलनं दिलेल्या माहितीत आता कामाचा कालावधी हा कमीत कमी 9 तास करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर कर्माचारी 12 तासांपर्यंत काम करू शकतात. त्यामुळं कर्मचाऱ्यांना तासांच्या हिशोबानं पगार दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याशिवाय, खास श्रेणी असलेल्या कर्माचाऱ्यांसाठीच्या नियमातही काही बदल करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सुट्टीच्या दिवशी मिळणार जादा कामाचा मेहनता
केंद्र सरकारच्या श्रम विभागानं दिलेल्या माहितीनुसार 9 तास काम केल्यानंतर जादा कामाचा मेहनता देण्यात येणार नाही. केंद्रीय नियमातील 1950च्या कायद्यानुसार 9 तास काम केल्यानंतर प्रत्येक कामगाराला 150 ते 200% दरानं वेतन दिले जात होते. मात्र आता नवीन नियमानुसार केवळ सुट्टीच्या दिवशी काम केल्यानंतर जादा कामाचा मेहनता मिळणार आहे.