मुंबई – आसाम, बिहार आणि उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत आता आसामच्या मदतीला बिग बींनी हात पुढे केला आहे. अमिताभ बच्चन आसामच्या मुख्यमंत्री रिलीफ फंडमध्ये ५१ लाख रुपयांची मदत केली आहे. याबाबत स्वतः अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून याबद्दल माहिती दिली. तसेच आसाम येथील आपत्तीतून पीडितांना बाहेर काढण्यासाठी मदत करण्याचं आवाहन केलं आहे.
Assam is in distress .. the floods have caused great damage .. send care and assistance for our brothers and sisters .. contribute generously to the CM Relief Fund .. I just did .. HAVE YOU ..? ??? https://t.co/DZIpxZ0eOl
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 23, 2019
तत्पूर्वी, अक्षय कुमारने आसामच्या मुख्यमंत्री रिलीफ फंड आणि काझीरंगा नॅशनल पार्कसाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत केली आहे. स्वतः अक्षयने ट्विटरवरून याबद्दल माहिती होती.