भोपाळ – मध्यप्रदेशातील राजगढ जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात येणा-या चारचाकी वाहनाने कंटेनला मागून धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. हा अपघात इतका भयंकर होता की, चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत.
एबी रोडवर उडनखेडीजवळ अपघात झाला. उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात येणारी भरधाव कार थेट कंटेनरमध्ये घुसली. हा अपघात पहाटे 5 वाजण्याच्या सुमाराम दाट धुक्यामुळे झाल्याची प्राथमिक माहिती कळते. यात चार जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.
पाच जखमींना इंदूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशातून संपूर्ण कुटुंब पुण्यात येत होते. त्याचवेळी हा भीषण अपघात झाला. दरम्यान, यापूर्वीही दाट धुक्यामुळे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत.