मुंबई – सायकल चोरणारे नारायण राणे मंत्री झाले. स्वार्थासाठी लोक आपला बाप बदलतात अशी खोचक टीका शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री गुलाबराव पाटील केली आहे.
सांगोला येथील एका कार्यक्रमादरम्यान गुलाबराव पाटील यांनी सायकल चोरणारे नारायण राणे मंत्री झाले . असं म्हणत राणेंवर घणाघात केला आहे.
त्यांनी पुढे ईडीच्या कारवाईंवरुनही भाजप पक्षावर निशाणा साधला आहे,’आमची सत्ता व्यवस्थित आहे म्हणूनच ५० हजारांच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला की ईडीची चौकशी लावली जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.
“आम्हाला जेल नवी नाही, बॅचलर ऑफ जेल म्हणजे शिवसैनिक आहे एवढं लक्षात ठेवा. बोकडाला मरण ही परमेश्वर ठरवतो मग आमचं मरण ईडी ठरवणार आहे का?,” असा सवालही यावेळी त्यांनी केला.