चंदीगड – हरियानांतील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यंत्री भुपेंद्र हुडा हेही बंडाच्याल पवित्र्यात असल्याचे त्यांच्या आजच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. कॉंग्रेस आता पुर्वीची राहिलेली नाही असेहीं त्यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने देशहिताचा निर्णय घेतला तर त्याचे आपण स्वागतच करू असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी भाजपवरही टीका केल्याने ते भाजप मध्ये न जाता आपला स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कॉंग्रेस मधील आपल्या सहकार्यांनी काश्मीर बाबतच्या निर्णयाला विरोध केला त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली.
आता पुर्वीची कॉंग्रेस राहिलेली नाही असे त्यांनी नमूद केले. हरियानातील भाजप सरकार मात्र सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे असे नमूद करून त्यांनी म्हटले आहे की केंद्राच्या कलम 370 च्या आड लपून आपले अपयश झाकले जाईल या भ्रमात भाजप सरकारने राहु नये. रोहटक येथे आयोंजित करण्यात आलेल्या एका मेळाव्यात ते बोलत होते.