मुंबई – भीमा-कोरेगाव दंगलप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनआयएकडे तपास वर्ग केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मी भीमा-कोरेगावचा तपास केंद्राकडे दिलेला नाही आणि देणार देखील नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले कि, एल्गार आणि भीमा कोरेगाव हे दोन वेगळे विषय आहेत. माझ्या दलित बांधवांचा जो विषय आहे तो भीमा कोरेगाव बद्दल आहे आणि त्याचा तपास मी केंद्राकडे दिलेला नाही आणि देणार नाही आणि मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की दलित बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही.
“एल्गार आणि भीमा कोरेगाव हे दोन वेगळे विषय आहेत. माझ्या दलित बांधवांचा जो विषय आहे तो भीमा कोरेगाव बद्दल आहे आणि त्याचा तपास मी केंद्राकडे दिलेला नाही आणि देणार नाही आणि मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की दलित बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही.”
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) February 18, 2020
Maharashtra CM Uddhav Thackeray: Elgaar Parishad case&Bhima Koregaon case are 2 different cases. Bhima Koregaon case is related to my Dalit ppl & the probe related to the case yet not given to Centre&it will not be handed over to Centre. Centre has taken over Elgaar Parishad case pic.twitter.com/AFv6xNSFKt
— ANI (@ANI) February 18, 2020
दरम्यान, राज्य सरकार आणि न्यायालयाने एल्गार प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यास हिरवा कंदील दाखविल्यानंतर एनआयएने तपास आणि तपासासंदर्भात कागदपत्रे घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.