नवी दिल्ली : भीमा कोरेगाव प्रकरण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात रचलेला कट आहे, असे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनावाझ हुसेन यांनी सांगितले.
हे प्रकरण हा पंतप्रधानांविरोधातील कट आहे. त्यातील दोषींना शिक्षा करण्यात येईल. या मुद्यावर बोलण्याचा उध्दव ठाकरे यांचा संबंध काय असे ते म्हणाले.
शरद पवार यांची सुरक्षा काढून घेतली. जीविताला असणारा धोका पाहून सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येते. पवार यांच्या जीविताला धोका नाही. त्यांच्या सुरक्षिततेची दिल्लीत दिल्ली पोलिस काळजी घेतील, असे ते म्हणाले.