बंगळुरू – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रिमोट कंट्रोलच्या टीकेला कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी बंगळुरू येथे एका प्रचारसभेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा रिमोट कंट्रोल कुठे आहे असा सवालच खर्गे यांनी यावेळी भाजपला विचारला.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे सत्य बोलल्यामुळे त्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप करतानाच खर्गे म्हणाले की यामुळे आम्ही घाबरणार नाही आणि आम्ही त्यांचा सामना करण्यासाठी तयार आहोत.
कॉंग्रेस पक्षाने खर्गे यांना अध्यक्ष केले. मात्र त्यांचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच कोणाकडे आहे. खर्गे हे केवळ नाममात्र अध्यक्ष आहेत. त्यांच्याशी जशी वागणूक होते आहे त्यावरून कोणालाही समजू शकते की त्यांचा रिमोट दुसऱ्याकडे आहे अशी टीका मोदी यांनी कर्नाटकातील एका भाषणात केली होती.
J&K Assembl Elections : …त्यामुळेच मतदारांना सामोरे जाण्याची भाजपला वाटतेय धास्ती – ओमर अब्दुल्ला
त्याला खर्गेंनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की राहुल गांधी यांनी अदानी यांच्यासंदर्भात काही विधाने केली तर त्यांचे वक्तव्य रेकॉर्डवर घेण्यात आले नाही. माझेही राज्यसभेतील भाषण रेकॉर्डवर घेण्यात आले नाही. आपल्या देशात लोकशाही आहे. मात्र आता अशा प्रकारच्या लोकशाहीने देश चालवला जातो आहे. त्यांची ईडी, सीव्हिसी, सीबीआय आम्हाला घाबरवूू शकत नाही. राहुल गांधीही कधी घाबरले नाहीत व घाबरणारही नाहीत. ते केवळ सत्य सांगत असून त्या व्यक्तीला त्रास दिला जातो आहे. मात्र त्यांना तसे करू द्या. ते राहुल गांधी यांना तुरूंगात टाकणार आहेत का? आम्ही प्रत्येक स्थितीचा मुकाबला करण्यासाठी तयार आहोत.